Posts

Showing posts with the label आत्मनिर्भर बना

आत्मनिर्भर बना, शब्द कसे सुचतात

Image
मला लिहायला जमेल का.... शब्द कसे सुचतात... लेखक-डॉ सौ अनघा कुलकर्णी लिहायला सुरुवात केली की सुचत जाते ,मनाच्या खोलवर शब्द साठलेले असतात ते वर येऊ द्या,शब्द पोहायला लागले की ते पकडा,आपोआपच रचना रचली जाते,आणि साहित्यात भर पडते--- आणि आपल्याला लक्षात येते की अरे मी पण साहित्यिक आहे,......मग मात्र थांबायचे नाही....भरपूर साहित्य सहजपणे आपल्या ब्लॉग वर साठते, कोणी वाचावे ही अपेक्षाच ठेवायची नाही, आपले कौतुक आपणच करायचे,आनंद झाला तरी लिहायचे...दुःख वाटले तरी लिहायचे....मन उदास झाले तरी लिहायचे....आणि एक दिवस लक्षात येत की .....आपल्याला सुद्धा जमतंय 😄😄फार फार भारी वाटतं त्यावेळी